कोरोना संसर्गाने जगभर मोठा हाहाकार माजवला आहे. आपल्या देशातही संसर्ग सुरु आहे. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करत आहे. लोकांनी भीती न बाळगता, घरात बसून पूर्ण दक्षता घ्यावी याचे आवाहन वारंवार केले जात आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. त्यात रुग्णालय आणि मेडिकल हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या गोष्टीची जाणीव ठेवून लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथील 80 डॉक्टर आणि निरा येथील 20 डॉक्टर्सनी मिळून ‘रक्षक रुग्णालय’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे. त्या संदर्भात डॉ. मिलिंद काकडे यांच्याशी संवाद साधून हा लोकोपयोगी आणि डॉक्टरांच्याही सुरक्षेला प्राधान्य देणारी संकल्पना काय आहे त्याचा घेतलेला हा वेध…