कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे. पण आता कोरोनाची लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
दरम्यान 27जानेवारी ला महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.