नवी दिल्ली | दिल्ली येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या ५ व्या दिवशी आज महाराष्ट्राच्या अवंतिका नराळेने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत आज महाराष्ट्राला धावण्याच्या शर्यतीत १ सुवर्ण, भारोत्तोलनात २ तर व्हॉलिबॉल आणि कुस्तीत प्रत्येकी एक कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेच्या ५ व्या दिवसाअखेर महाराष्ट्राने १६ सुवर्ण, १५ रजत आणि १९ कांस्य पदकांसह एकूण ५० पदक पटकावून पदक तालिकेत तिसरा क्रमांक मिळविला आहे.
