हिवाळ्याच्या या वातावरणात त्वचा कोरडी पडते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळ करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा जात नाही. हिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा. हिवाळ्यात शक्यतो साबणाचा वापर टाळावा किंवा वापर कमी करावा. शक्य झाल्यास ग्लिसरीयुक्त साबणाचा वापर करावा. त्यामुळे त्वच्या मऊ राहते. हिवाळ्यात आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा माॅयश्चरायझर लावावे. पण हे लावल्यानंतर पावडर लावण्याचे टाळावे.
हिवाळ्यात सर्वात जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसात पायांना भेगा पडतात. आणि भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यावर लगेचच तळपाय वझरीने रगडून घासावे. पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा माॅयश्चरायझर लावावे. पाय जास्त कोरडे पडू नये यासाठी हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.