नागपूर | राज्यातील सर्व भागांचा समान विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नेहमी सतर्क राहावे लागते. विकास कामात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विधिमंडळात उपलब्ध असलेल्या विविध आयुधांचा योग्य उपयोग करुन विकासात्मक कामे, आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘लोकशाही राज्यातील लोकप्रतिनिधींची विकासात्मक भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.