मुंबई | कुमारी ज्योती किसनजी बालपांडे संदर्भातील प्रकरणात कोणताही निकाल देताना सर्वप्रथम विधी व न्याय आणि सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घ्यावेत, असे निर्देश महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी उपस्थित राज्य महिला आयोगाचे सदस्य व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आज मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते.