कल्याण | कल्याण येथील पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा” राबवण्यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती पांडुरंग म्हात्रे हे होते. तर प्रमुख अतिथी, सभापती दर्शनाताई जाधव, सामाजिक कार्यकर्ते अशोक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार सतिष राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, डॉ.कापुस्कर, पत्रकार संजय कांबळे, उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थित होती
या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील आरोग्य क्षेत्रामधे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ” स्वयंसेविका, आशा, आरोग्यसेवक, नर्स, परिचर, वैद्यकीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.तानाजी चव्हाण, अशोक चव्हाण, पत्रकार सतिष राठोड, यांनी “लोकसंख्या वाढ” कशी रोखता येईल याबाबत उपस्थित कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच पावसाळा सुरु असल्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्याची काळजी घेऊन हिवताप, डेंग्यू, अशा साथिच्या रोगाची लागण होऊ नये यासाठी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे व ” लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा ” या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश राठोड तर सूत्रसंचालन खिस्मत रावसाहेब यांनी केले. तर आभारव्यक्त डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले.
सतिष राठोड, प्रतिनिधी