मुंबई | राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र शासनाने चार हजार सातशे कोटी रुपयांची ऐतिहासिक अशी मदत जाहीर केली आहे. ही मदत वेळेत मिळाल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
ही मदत फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.