• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Monday, April 19, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

तुम्ही अडीच महिने न्यूज चॅनल बघणे बंद करु शकत नाही का? – रवीश कुमार

The TeambyThe Team
March 1, 2019
inArticle
0 0
0
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आपलं नागरिकत्व सांभाळायचं असेल, लोकशाही व्यवस्थेत जबाबदार नागरिक म्हणून भूमिका निभवायची असेल तर, न्यूज चॅनल्स बघणं बंद करा. कुटुंबातल्या मुलांना जातपंथधर्मभेदाभेदापासून दूर ठेवायचं असेल तर, चॅनल्स बघणं थांबवा. भारतातली पत्रकारिता वाचवायची असेल तर, न्यूज चॅनल्स पाहाणं बंद करा. अगदी, मलाही बघणं बंद करा. पण न्यूज चॅनल्स बघणं बंदच करा. न्यूज चॅनल्स बघणं हे स्वतःचंच पतन बघणं आहे.

मी हे आधीपासूनच सांगत आलोय. या वेड्या नशेतून बाहेर येणं तितकं सोपं नाही. तरी, आवाहन करतो की, येते अडीच महिने तरी, न्यूज चॅनल्स बघणं थांबवा. आत्ता, तुम्ही चॅनल्सवर जे बघतात ते सणकी, उन्मादी आहे. भारत-पाकिस्तान तणाव नसतो तेव्हा, ही चॅनल्स मंदिराचा विषय काढून ताण निर्माण करतात. मंदिराचा विषय नसतो तेव्हा, पद्मावतीसारख्या चित्रपटाचा विषय, चित्रपटाचा विषय नसतो तेव्हा कैरानाबद्दलच्या असत्यकथांतून हिंदू-मुस्लीमांत तणाव तयार करतात. काहीच नसतं तेव्हा, फेक सर्व्हेंवर तासन्‍ तास निरर्थक कार्यक्रम करत राहातात.

तुम्हाला कळतंय का, की हे सगळं का चाललंय? न्यूज चॅनल्समध्ये कुठे तुम्ही स्वतः म्हणजे, पब्लिक, सामान्य लोक दिसतात का तुम्हाला? या चॅनल्समधून तुम्हा लोकांना हाकलून टाकलं गेलं आहे. ही लक्षात न येण्याजोगी छोटी गोष्ट नाही. लोक त्रासलेले आहेत. एका चॅनलवरून दुसर्‍या चॅनलवर ते भटकत राहातात. त्यांच्यासाठी चॅनल्सवर अवकाशच शिल्लक नाही. युवकांच्या अनेकानेक समस्यांना तिथे जागा नाही. मात्र, चॅनल्स स्वतःचा मुद्दा त्यांच्या माथी मारून त्यांना मूर्ख बनवत आहेत. चॅनल्सकडे तसले मुद्दे कुठून येतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ही चॅनल्स आता जेव्हा काही करतात, काहीही करतात, ते एक तणाव निर्माण करण्यासाठी. तणाव, एका नेत्यासाठी मार्ग प्रशस्त करून देणारा. नेत्याचं नाव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूज चॅनल्स, सरकार, बीजेपी आणि मोदी हे सारं एकमेकांत विलीन झालं आहे. इतकं की, पत्रकारिता आणि प्रोपगंडा यातला फरक कळणंच मुश्कील. तुम्हाला एक नेता प्रिय असणं. हे स्वाभाविक आणि बव्हंशी गरजेचंही. पण, तुमच्या नेत्यावरच्या प्रेमाचा फायदा घेऊन या चॅनल्सद्वारे जे केलं जातंय ते धोक्याचं आहे.
सरकार आणि मोदी यांच्या भक्तीच्या नावाखाली प्रोपगंडा करणं हा, खरं तर त्यांच्या समर्थकांचाही अपमान आहे. उपलब्ध पर्यायांतून, मिळालेल्या माहितीतून ज्या समर्थकाने एक निवड केली आहे, त्याला मूर्खच समजण्यासारखं आहे. कारण, भाजपच्या जबाबदार समर्थकांनाही खर्‍या माहितीची गरज असतेच. तेव्हा, ही न्यूज चॅनल्स फक्त सामान्य नागरिकांचा नाही, तर भाजपसमर्थकांचाही अपमान करत आहेत.

मी भाजप समर्थकांनाही आवाहन करतो की, तुम्ही ही चॅनल्स बघू नये. भारतीय लोकशाहीचा घात करण्यात सामील होऊ नका. सांगा बरं, या चॅनल्सविना तुम्ही नरेंद्र मोदींचं समर्थन करू शकत नाही का? त्यांचं समर्थन करण्यासाठी पत्रकारितेच्या अवनतीचंही समर्थन करण्याची गरज आहे का? तसं करत असाल तर, तुम्ही इमानदार राजकीय समर्थक आहात, असं म्हणता येणार नाही. श्रेष्ठ पत्रकारितेच्या निकषांसह मोदीजींचं समर्थन करणं अशक्यच होऊन गेलंय का? भाजप समर्थकहो, तुम्ही भाजपची निवड केली होती, या चॅनल्सची नाही. मीडियाचं पतन म्हणजे राजनीतीचंही पतन. एका चांगल्या समर्थकाचंही अवरोहण.

न्यूज चॅनल्स तुमच्या नागरिकत्वावर हल्ला करत आहेत. लोकशाही रचनेत नागरिक हवेतल्या हवेत तयार होत नसतात. एखाद्या भौगोलिक प्रदेशात जन्माला आल्याने कुणी नागरिक बनत नसतं. योग्य माहिती मिळणं आणि प्रश्न उपस्थित करता येणं हे नागरिकत्वासाठी अनिवार्य असतं. या न्यूज चॅनल्सकडे हे दोन्ही नाही. पंतप्रधानांनी या पत्रकारितापतनाचं पालकत्वच घेतलंय जणू. त्यांच्यावरच्या भक्तीपायी या चॅनल्सनी स्वतःला जोकर बनवून ठेवलंय. आणि तुम्हालाही उल्लू बनवत आहेत. तुम्ही उल्लू बनणं हे, लोकशाहीचा अस्त होणं आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या निमित्ताने या चॅनल्सना राष्ट्रभक्त होण्याची संधी मिळाली. देशाविषयी भक्ती असती तर, यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचे उत्तम मानदंड घडवले असते. चॅनल्सकडून ज्या प्रकारचा हिन्दुस्तान आपल्यावर लादला जातोय, तो आपला देश नाही. तो एक नकली देश आहे. देशावर प्रेम याचा अर्थ आपण आपापलं प्रत्येक काम उच्च आदर्श आणि मूल्य ठेवून करणं. पण ही चॅनल्स तुमच्यातल्या स्वाभाविक देशपप्रेमाचा प्रवाह अडवून तुमचा कृत्रीम रोबो करू बघतायत. खोटी माहिती देणार्‍या सवंग विश्लेषण करणार्‍या चॅनल्सनी एक सक्षम विरोधी पक्ष होण्याची सगळी शक्यता संपवून टाकली आहे. वृत्तपत्रांचीही तीच स्थिती आहे.

शब्दांकन: सुदाम राठोड

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

The Team

The Team

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: