भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. आयोगाने लोकसभेच्या एकूण 543 जागांवर 7 टप्प्यात निवडणूक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच 11 मार्च 2019 पासून देशात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
11, 18, 23, 29 एप्रिल आणि 6, 12 आणि 19 मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही 23 मे 2019 रोजी होईल. 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच घेण्यात येणार आहेत.