यावर्षीच्या अर्थसंकल्पात अन्नधान्याच्या संदर्भात दिल्या जाणार्या अनुदानात 20% वाढ केली जाऊ शकते. 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या वार्षिक अंदाजपत्रकात 1.84 लक्ष कोटी (महादम किंवा ट्रिलियन) रुपयांनी अनुदान वाढविण्यात आले आहे, ज्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत भारतीय अन्नधन्य महामंडळ (FCI) याला केले जाईल. त्यामुळे विकेंद्रीकृत धान्य खरेदीसाठी दिल्या जाणार्या अनुदानाची एकूण रक्कम जवळपास 2.21 लक्ष कोटी रुपयांपर्यंत पोहचणार.
अनुदानातली 20% वाढ अनुदानाच्या बिलामध्ये आणखी 36,000 कोटी रुपये जोडणार. सध्या अन्नधान्यावर दिले जाणारे अनुदान 1.84 लक्ष कोटी रुपये एवढे आहे.