भारताचा गोलंदाज जसप्रित बुमरा ह्याने ‘क्रिकेट विश्वचषक 2019’ या स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम करीत त्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने दिमुथ करुणारत्नेला बाद करुन 100 बळी टिपण्याचा विक्रम केला.
जसप्रित बुमराने केवळ 57 सामन्यांमध्ये हा विक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. तो सध्या ICCच्या एकदिवसीय गोलंदाजांच्या मानांकन यादीत प्रथम क्रमांकाचा गोलंदाज आहे.
अफगाणिस्तान संघाचा रशीद खान हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान म्हणजेच केवळ 44 सामन्यांमध्ये 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा प्रथम खेळाडू आहे.