देश कोरोनाच्या संकटात असताना राजकारणाचा डमरू कुणी वाजवू नये, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले आहेत. आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये, असं म्हणत नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्या देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. या संकटात राजकारण करणं गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.