महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अनाथ पंधरवड्याचा सांगता समारंभ संपन्न. अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील, त्यांच्या सक्षमीकरणासाठी घेतले विविध निर्णय. मुंबईतील अनाथ बालकांना प्रातिनिधिक स्वरुपात अनाथ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित अनाथ पंधरवडा सांगता समारंभात राज्यमंत्री कडू बोलत होते.महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, अपंग, अनाथ, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये ठळक स्थान असायला पाहिजे. अनाथांना शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतल्याने त्यांच्या जीवनात पहाट येणार आहे. अनाथांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात येत असून त्यांनी देशाचे पालनकर्ते होण्याची स्वप्ने पहावीत असा प्रोत्साहक संदेश महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.