तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, […]
आयुष्यात येणा-या अनेक अडचणी आणि संकटांवर स्वार होऊन हृदयात जपलेल्या आपल्या स्वप्नांचा वेड्यासारखा पाठलाग करणारा एक ध्येय वेडा तरूण आनंद बनसोडे. “जिंदगी की यही रीत है!हार के बाद ही जीत है!” मि. इंडिया या चित्रपटातील किशोर कुमारजींनी गायलेलं हे गाणं माझ्या डोळ्यांसमोर सहज तरळून गेलं, जेव्हा सोलापूरातील तरूण गिर्यारोहक, लेखक आणि प्रेरणादायी वक्ता आनंद बनसोडे […]
कऱ्हाड म्हटलं की यशवंतराव चव्हाण, बारामती म्हणजे शरद पवार आणि आमचं पुसद म्हटलं की आठवण येते ती नाईक साहेबांची. पुसदचा आहे असं म्हटलं की, सगळ्यांचं पहिलं वाक्य असतं ते म्हणजे नाईक साहेबांच्या गावचा. वसंतराव फुलसिंग नाईक. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नाईक साहेबांचा प्रवास हा थक्क करणार आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्राचं दीर्घकाळ म्हणजे तब्बल […]
ज्येष्ठ महिन्यात येणा-या पौर्णिमेला आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आपले पूर्वज अतिशय हुशार व शास्त्रीय आधारावर काम करणारे होते. आपल्या वेदांचा अभ्यास केल्यास अनेक गोष्टी आपणांस कळतील. आपल्या देशात झालेल्या वेगवेगळ्या परकियांच्या आक्रमणात आपले अमुल्य, अतुल्य ज्ञान नष्ट करण्यात आले. आयुर्वेदात वर्णन केलेले वडाचे औषधी उपयोग सर्वांनीच वटपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती करून घ्यायला […]
आज सोशल मिडियावर जितके लोक मला ओळखतात, त्यातला सर्वात जास्त टक्का हा मनसे आणि राजसाहेब ठाकरे या दोन गोष्टींमुळे ओळखणाऱ्यांचा आहे. सध्या मी पक्षाचं काम करत नाही. मी माझं मत तटस्थ ठेवलंय. पक्षातल्या आणि साहेबांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. पण साहेबांवरचं आणि पक्षावरचं प्रेम कमी झालं नाही. राजसाहेबांमध्ये एक चुंबकीय आकर्षण आहे. तुम्ही त्यांच्यापासून कितीही […]
शिवरायांनी सतत तीस वर्ष धडपड करून एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे हे हिंदुस्थानातील सर्व राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्या राज्याचा हिंदुधर्माच्या वतीने इतरांना जाब विचारायचा अधिकार आहे हे सर्वांना कळून येते त्यांना जरब बसावी या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडायचे ठरविले. राज्याभिषेकाचा मुहूर्त ५ […]
पर्यावरणाचा ताल आणि तोल जर कुणी सांभाळत असेल तर त्या वनस्पती. आजच्या घडीला आपण सावलीच्या शोधात असतो ;पण या वृक्षवल्लीचे महत्त्व जाणून घेत आपण त्यांना साथ दिली व मनापासून झाडे लावली तर पर्यावरणाचे चित्र बादलू शकते वृक्षवल्ली कोणताही भेदभाव न ठेवता सज्जनांना आणि दुर्जनांना सारख्याच भावनेने साळली , फळे , फुले देतात. झाडाची तोड करणा-या […]
आज सारं आकाश उजळलेल वाटतंय, अंधाऱ्या रात्रीही सारं जग उजेडात दिसतंय. पण हा प्रकाश कोणत्या तारे, चंद्र ग्रहाचा नाही, तर आहे तो तिला लागलेल्या ग्रहणाचा. वाटे वाटेवर, चौका-चौकावर वितळणाऱ्या त्या मेणबत्यांचा, ज्यामुळे मला श्रद्धांजली वाहली जात आहे. असाच एक दिवा तिच्या घरीहि तेवत असणार. ज्यामुळे सारं घर नव्हे तर घराचा एक कोपरा तरी उजेडात असणार. […]
यंदा चार वेळा ग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी एकूण चार ग्रहणे लागतील. त्यातील दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणे असणार आहेत. त्यातील पहिले चंद्रगहण २५ मे रोजी लागणार आहे. हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. २६ मे म्हणजे बुधवारी वैशाख पौर्णिमेला दिसणार आहे. या ग्रहणाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे ग्रहण संपूर्ण चंद्रात दिसणार नाही, […]
सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते. लहान असताना आपल्या झोपायच्या वेळा आणि उठायच्या वेळा ठरलेल्या असतात, मात्र मोठं झाल्यावर आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या झोपायच्या व उठायच्या वेळा ठरलेल्या नसतात. पण रात्री लवकर झोपणे आणि लवकर उठणे शरीरासाठी उत्तमचं. लवकर उठल्याने आपले शरीर निरोगी राहते. सकाळी लवकर उठून चालण्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या उन्हात किमान चालण्याने […]